जेपींचे मन किती मोठे आहे, हे सर्वज्ञात होते; तरीही लोहियांविषयी इतकी अढी त्यांच्या मनात का होती? त्यांनी ती बाजूला ठेवून लोहियांना जवळ का केले नाही?
जेपी आणि लोहिया यांच्यात स्पर्धा होती का? पण लोहियांनी तर नेहमीच त्यांची नेतृत्व क्षमता मान्य केली होती. मग यामागील कारण काय होते? परस्परांना समजून घेण्यातील अपयश की, दुखावलेल्या भावना? जेपी-लोहिया संबंध हे माझ्या दृष्टीने एक गूढ होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून जेपींचे मन वळवण्याचे प्रयत्न लोहियांनी केले नव्हते असे नाही, पण ते अपयशी ठरले होते.......